Sunday, March 10, 2013

पत्र पहिले: बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर


बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर

काश्मीरमध्ये काम करताना अनेक अनुभव गाठीशी बांधले गेले. पण प्रत्येक काश्मीरी माणसाच्या मनात नेहमीच सलणारा प्रश्न बॉम्बस्फोटांच्या (१३/२, पुणे) निमित्ताने अगदी प्रकर्षाने जाणवला. लिहावं की नाही आणि लिहावं तर कसं हे समजत नव्हतं...शेवटी आज नेहमीप्रमाणे न विचार करता लिहायला बसलो आहे...

परवा सकाळमध्ये बातमी वाचली-'२२०० घरांवर छापे, भाडेकरूंची माहिती द्यावी, पोलीसांची शोधमोहिम'-मनात एकदम विचारांची गर्दी झाली; कारण याच वर्षी नूर महम्मद बसू या माझ्या मित्राला मी पुण्यामध्ये आणले आहे. काश्मीरमधील बंद, संप अशा पार्श्वभूमीवर शिक्षणामध्ये  येणार्या अडथळ्यांशिवाय त्याने शिकावे आणि याचीच पुनरावृत्ती काश्मीरमध्ये करावी असे वाटते. म्हणूनच सहकार्यांच्या सहाय्याने त्याला अॅडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यासाठीची कागदपत्रे मागवून त्याला इथेच थांबवून घेतले आणि ''आता सहा महिने कार्यकर्ता कसा असतो हे बघ...थोडे मराठी शिक...एकात्मतेची भावना जप आणि मग एकत्र काम करता करता शिक्षण घे'' असे त्याला सांगितले आणि इथे ठेवून घेतले.

खूप एक्सट्रीम चा विचार केला तर समजा नूर ला चौकशीसाठी पोलिसांनी पकडले तर नूरला सोडवायला आणि त्याच बरोबरीने आपल्याला आपले काम सिद्ध करून जबाबदारी स्वीकारायला २-३ दिवस लागले तर त्या वेळात नूरच्या विचारांमध्ये होणार्या बदलांचे अंदाज बघता , २००७ मध्ये कश्मीरमध्ये कश्मीर युनिवर्सिटी मध्ये झालेल्या चर्चेची आठवण झाली...

चर्चेदरम्यान एक मुलगा तावातावाने म्हणाला,''मैं कहीं पे भी जाऊं, मुझे हमेशा मिलिटंट कह के ही बुलाया जाता है. हर कश्मीरी मिलिटंट नही होता. लोग मजाक में भी कहते है. लेकिन हमे सीनेमें चोट लगती है. उपरसे ये आर्मी वाले जिंदा नही रहने देते... मेरे घर में अंदर- बाहर करने के लिये मुझे आय कार्ड दिखाना पडता है. इनके पास ताक़द है, तो उनकी मनमानी चलती है. ना इधर जी सकते है, ता उधर. एक तरफ फौज और दूसरी तरफ मिलिटंट्स...''

आर्मी च्या प्रश्नावर उत्तर शोधताना मी त्याला म्हणाले होतो, की सिस्टिम चुकीची आहे, चूक करतही आहे असे मानू. पण म्हणून ती संपवणे हा उपाय नाही होऊ शकत, आपणही सिस्टीमचे भाग आहोत आणि सिस्टीम आपल्यालाच बदलावी लागेल ; पण दगड-बंदुकीने नव्हे...आणि मग एक रोप क्लाईंबिंग चे उदाहरण देऊन मी त्याला हे समजावले होते-गाठ टोचतीये म्हणून सोडली तर खाली पडून कपाळमोक्षच! गाठीची आवश्यकता आहेच. मग मऊ गाठ बांधणे किंवा ती टोचू नये म्हणून अॅडिशनल सपोर्ट किंवा कुशनिंग करणे गरजेचे आहे.

अनुत्तरित राहिला पहिला प्रश्न...जो आज पुण्यात झालेल्या ब्लास्टने पुन्हा समोर उभा राहिला-''जहाँ भी जाओ हमें मिलिटंट्स ही समझते है'' या २२०० लोकांच्या धरपकडीची बातमी वाचताच नूरच्या घरातील, त्याचा मित्रपरिवारातील सगळ्यांचे फोन येऊन गेले-''सारंग भैय्या, आपकी जिम्मेदारी पर उसको वहाँ भेजा है; मासूम है, छोटा है, कुछ परेशानी तो नहीं होगी? आपभी इनके सामने क्या कर पाओगे? हालात बहुत नाजूक हो चुके है और हम कश्मीरियों पे तो जैसे मिलिटंट होनेकी मोहर ही लगा दी है...हम हमारे बच्चेको पढाना चाहते है...''

याच बोलण्यात त्यांनी असेही सांगितले, ब्लास्ट नंतर जखमी लोकांना सहानुभूती, रक्त, उपचार यांची गरज आहे की यांच्यापैकी कोणी अतिरेकी आहे का याची चाचपणी आधी व्हावी?काश्मीरमध्ये अनेकवेळा ब्लास्ट झाले, होतात, पण म्हणून प्रत्येक काश्मीरी अतिरेकी नाही. गरज मानवतेच्या दृष्टिकोनाची आणि सहानुभूतीची आहे...

हे कोडं सोडवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सजेशन्सची गरज आहे

1 comment:

  1. Finally you are here... sharing your letters on a more open forum.... That's nice :)

    ReplyDelete